Monday, June 30, 2014

एकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण??



आमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात.
तर असंच परवा आमच्या गावातला एक 'पंटर' सापडला आणि बोलता बोलता आमचा विषय 'हागणदारी मुक्त' वरून 'पाणी बचाव आंदोलना'पर्यंत कसा गेला ते पहा :



मी : काय म मज्जा हाय लगा तुमची. सरकार आता तुमच हगलेल बी काढालंय.

पंटर: कसलं काय घेवून बसलाइस. सरकार हगलेल काढतंय पर त्यासाठी सकाळी तासभर चड्डी धरून उभा रहायला लागतंय त्येच काय.

मी: तवढी कळ तर सोसायला पायजेलच की. तुम्हाला फुकट बी पायजे आणि लगेच बी. कस जमल. सोसा जरास आसुदे म्हणून.

पंटर: ते सोसालायोच र. पर कामाचा खुळांबा व्हायलाय कि त्यापायी. च्यामायला हगायला जायचं म्हणून सकाळी लवकर उठाया लागालंय नाहीतर पुढ धार काढायचं आणि वैरण आणायचं काम बोंबलतय.

मी: ते बी खर हाय म्हणा. बाकी पावसा-पाण्याच काय. पेरण्या काय म्हणत्यात.

पंटर: काय न्हायी लगा यंदा. पेरण्या झाल्या खर पाऊस न्हायी, पिकं गेली समदी. प्यायला बी पाणी नाही. धरणातालच पाणी आटायला लागलंय आता.

मी: सगळीकडच र. पाप केल्यासात तुम्ही, त्याच भोगा आता.

पंटर: त्येच मी म्हणतोय, हि गावोगावी कशाला संडास सरकार बांधालय? ह्यामुळच पाणी टंचाई आलीया.

मी: हाहा, काय बी बोलू नग. त्येच्याआयला तुम्हाला हवेशीर बसायचं असतंय म्हणून आता त्येला दोष दे.

पंटर: न्हायी र. खरच तर. बघ हा. गेली १०-१५ वर्ष चालू हाय सरकारची योजना. त्यामुळ आता पर्यंत महाराष्ट्रभर संडास बांधून झाली असतील. साधारण पण एका माणसाला दिवसाकाठी सरासरी १० लिटर पाणी लागतंय.

मी: डोचक नासलय. तिथ काय आंघोळीला जात्यात व्हय.

पंटर: तुला काय माहित त्यातलं. संडास बांधल्यापास्न समदी बामन झाल्यात. म्हणून संडासात शिरायच्या आदी पाणी व-वतुन पाक करून घेत्यात आणि मंगच आत जात्यात.

मी: हात्येच्या आयला.

पंटर: तर १० लिटर पाणी एका माणसाला म्हटल्यावर १००० माणसाला १०००० लिटर पाणी रोजच. आदीमधी जात्यात ते आणि येगळच. आता हिशेब तूच लाव भावा. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वाया जाणार पाणी. त्येच जर उघड्यावर परंतु गावापासून दूर कुठतरी चर मारून संडास बनवली असती तर एका तांब्यात म्हणजे एक लिटर पाण्यात सगळ आटोपलं असत. त्यात आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीत बी मुरलं असत. रोगराई पसरू नये म्हणून त्या मलमुत्रावर औषध फवारल असत म्हणजे कसलंच टेंशन न्हायी. निदान नाही म्हटलं तरी आत्ता जेवढ पाणी वय जातंय त्यातलं अर्ध तरी या नुसार आपल्याला नक्कीच वाचवता आल असत. पर तुमच्या आडणी भोकाच्या सरकारला कळणार कधी. नुसत पैशाची नासाडी दुसर काही न्हायी. नाव मोठ करायला आणली यांनी योजना आणि हगायला पायजे म्हणून प्यायलाच पाणी मिळणा अशी अवस्था झालीया.

मी: ….


पंटर न मारली एकच फाईट आणि माझीच झाली कि हो टाईट

Saturday, June 21, 2014

चारोळी - ६

तीळ तीळ तुटणार काळीज
संपून जाईल असंच

तुलाही परतावं लागेल मग
आली आहेस तसंच

Tuesday, June 10, 2014

चारोळी - ५

तिला आवडतो पाऊस.
म्हणून मला ही भिजायचंय..

तिने धरलेल्या पदराखाली.
डोळं मिटून निजायचंय...!

Sunday, June 1, 2014

चारोळी-4

भेटल्यावर तुला,
रात्र फार व्हायची.
कारणं शोधायचो तेव्हा,
घरी उशिरा जायची..!

Wednesday, May 28, 2014

चारोळी-3

'नया हैं यह' म्हणून
गंडवल तिने मला
पाकीट खाली झाल्यावर म्हणते
'कौन हैं ये साला'

चारोळी-2

सवय जडलीये आता,
रसाळ आंब्याच्या बाठांची.,
पण सर नाही त्याला,
तुझ्या आबोली ओठांची..!

चारोळी-1

अरे हम गरीब हुंए तो हुवा क्या,
करते हैं दिलसे प्यार.
तुला करायचं असेल तर कर वरना,
दुसरी तरी बघू दे ना यार !!

Monday, May 12, 2014

कोणी माणूस आहे का, माणूस??

काळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत.
शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा.
दुसरं अस काहीच त्यांच्या जगण्याचा उद्देश नाही आहे.
हा काही अपवाद आहेत जे खरच एक माणूस म्हणून जगतात, इतरांना जगायला शिकवतात, संघटीत करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात त्यांना यश आहे परंतु ते फारच कमी प्रमाणात.
आजकाल लोकांना आपल्या बाजूला काय चाललंय याच सुद्धा भान राहिलेलं नाही, दुसर्यांच्या लग्नात लागलेला dj ऐकून कानाला हात लावून त्यांच्या नावाने बोट मोडणारे लोक आपल्या पोरांच्या लग्नात मात्र त्या वरच ठेका धरत असतात.
कित्येक वेळा आजूबाजूला हिंस्र पशु सारखी मनुष्यवृत्ती सुद्धा आदळून येते, बायाकापोरींना छेडणे, मारामाऱ्या करणे, दिवसाढवळ्या म्हातार्या माणसांना लुटणे यासारखे प्रकार आजकाल सर्रास दिसू लागले आहेत, मात्र त्यावेळी त्यांना आळा घालणे सोडून त्या वेळेवर टीकाटिपण्णी मात्र वाढू लागली आहे.
मोबाईल ने तर खरच क्रांती केली आहे, माणसं तोडायची, (माणसं जोडली असतीलही पण तोडली जास्त जातात, विचार करून बघा.) ह्याविषयी कितीही बोलाल तर ते कमीच आहे.
आपल आपल म्हणण्याच्या नादात मात्र माणूस एकमेकांपासून दूर जायला लागलाय.
पूर्वी एकत्र साजरे होणारे सण उत्सव आजकाल holidays झालेत.
आजी आजोबांच्या गोष्टी आता outdated झाल्यात.
भावंडासोबतचे खेळ पूर्वीसारखे रंगेनसे झालेत,
आईची माया सुद्धा आजकाल artificial वाटायला लागलेय.
मित्रमंडळी फक्त दारू आणि पार्टी पुरतीच मर्यादित झाली आहे.
माणूस प्रगत होत चालला आहे,
कमवत चालला आहे,
महिन्याला दोन-दोन मोबाईल बदलत चालला आहे,
माणूस माणसांतूनच हरवत चालला आहे.

सुख म्हणजे??



प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतता, त्यामुळे सुखासाठी पळत्याच्या पाठी न लागता जे आहे त्यातच समाधान माना आणि आहे ते चांगल आहे अस मानून पुढे चालत राहा.
आपण खुपदा अनुभवी माणसाणांकडून ऐकत असतो, मूड चांगला असला की आपल्याला ते सगळ पटत सुद्धा (मोठ्यांच बोलन ऐकून घेण ही सुद्धा एक कला असल्यामुळे त्याला असावा मूड लागतो.) आणि कधीकधी आपण खरच असल्या काहीशा गोष्टींवरती विचार करत बसतो कारण त्या काहीतरी खर सांगत असतात.
पण खुपदा ह्या रोजच्या दगदगीमधे पुन्हा आपण हरवतो. मनाला आणि शरीराला बर वाटेल अशा गोष्टीमधे पुन्हा फक्त सुख शोधू लागतो. जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवतेय किंवा ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण आनंदी आहोत त्यांच्या कडेच आपण झुकत रहातो.
परंतु त्याच वेळी ज्या व्यक्ती आपल्याला आपल्याला (वाटणारा) त्रास देतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्या आनंदावर विरजण येत किंवा आपल्याला दुःख होत राग येतो अशा व्यक्तीना मात्र आपण टाळत रहातो. आणि या व्यक्तीं मद्धे बघायला गेल तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी मंडळी असते. म्हणजे बघायला गेल तर आपण आपल्याच माणसांना कंटाळतो, त्यांची काहीच किंमत ठेवत नाही. जिची पूजा करायला पाहिजे त्या आई-बहिणीच्या नावाने एकमेकांना शिव्या घालतो. म्हणजे त्यांच्या वरचा खरतर तिरस्कारच आपण लोकांसमोर मांडत असतो.
पण का?? कारण ते उगाच इरिटेट करतात, नको असतानाही 'लेक्चर' देत बसतात न ऑल.
खरतर हीच लोक आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला बोलत असतात हे मात्र आपण विसरतो, आणि क्षणभंगुर अशा काही 'सुंदर' बोलणाऱ्या लोकांकडे आपण आकर्षित होतो.
माझ ही तसच, आईची आणि माझी सर्रास भांडण होत असतात. मी ही रागाच्या भरात तिला काहीही बोलून कुठेतरी जातो, ती मात्र रोज माझी अरेरावी ऐकून घेत असते, आणि काहीही न बोलता मागच सगळ विसरून रोज सकाळी हसऱ्या चेहऱ्याने माझ्या सुंदर दिवसाची सुरवात करते.
शेवटी आपली ती आपलीच मानस असतात, हे फ़क़्त आई साठी नसून माझा भाऊ, पप्पा, माझे खूप सारे मित्र आणि 'ती' सुद्दा. सगळे मला समजून घेतात आणि प्रत्येक दिवशी आपल्या वाट्याला येणार्या सुखाच्या काही ओंजळी माझ्यावर उधळतात. म त्यांच्यामुळे झाला, तरी थोडासा त्रास आपण का नाही समजून घ्यावा.
सुख म्हणजे पैसा, घर, गाडी, चिकणी गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड हे आहे, की आईच्या हातचा धपाटा, बाबांचे हळूच मारलेले टोमणे, मित्रांनी भांडून वाटून खाल्लेला वडापाव आणि तिने/त्याने अचानक फोन करून म्हटलेल 'i love you.'
पैसा तो हात का मैल है, आणि कमवायला अख्ख आयुष्य पडलय. पण आपल पाकीट अगोदरच इतक्या प्रेमळ माणसांनी भरलय तर अजून कशाची गरज आहे.
आहे ते एंजॉय करायच बस्स, और क्या चाहिये जिंदगी से.

Monday, February 17, 2014

ती सुंदर कल्पना !!

माझ्या डोळ्या देखत ओढलं त्याने,
काळाकुट्ट इसम,
अंगारलेले डोळे,
ताकद एखाद्या हत्तीची त्याच्या अंगी
अंगावर माझ्या शहारे
काहीच कळेना
पण किंचाळण्याचा आवाज मात्र कानावर
"वाचवा कुणीतरी"
काळीज फाडणारी आर्त किंकाळी,
जीव जातानाची सुद्धा नसेल होत अशी तडफड,
हाताच्या मुठी आवळून पुढे होणार मी,
इतक्यात अजून भयानक ३-४ जन मागून,
लोकांची पळापळ, भेदरलेल्या मेंढरांसारखी,
पण किंकाळण्याचा आवाज मात्र हळू हळू तीव्र,
काय करावे अशा वेळेला हे कळत होत,
मानाने ही केला निर्धार,
आयुष्यभर ज्या पुस्तकातून प्रेरणा घेतल्या,
त्यांची एकेक पान डोळ्यासमोर,
पण शरीर साथ देईना,
भोवळ येवुन पडतो कि काय,
काय चाललंय, थांबवायला हव आपण,
सरकलो त्या दिशेने,
नकळत पणे हातात दगड हि घेतला,
आणि पोटाची आतडी फाटेपर्यंत तोंडातून आवाज निघाला,
हिजड्यांच्या औलादी सगळ्या दचकल्या बहुतेक,
माझ्या दिशेने आले काही,
आणि
आणि
बस्स!
डोळ्यासमोर अंधार,
कधी न मिळालेली शांत झोप,
समोर फक्त शांत, निरभ्र आभाळ,
पक्षांचा मंजुळ किलबिलाट,
मंद वारा,
अचानक समोर,
एक सुंदर ललना, तितक्याच सुंदर वेशात,
काय तीच ते रूप, आहा!!
अस्सल नक्षत्र,
सगळ्या परीकथा आठवत,
नकळत गेले दोन्ही हात पुढे,
तिनेही आपले नाजूक हात हातावर ठेवले,
जवळ येवुन कानात काहीतरी कुजबुजली,
आणि,
अचानक,
कुठे गेली,
आता तर होती,
मी शोधू लागलो,
पन कुठेच दिसेना,
मी फक्त एकटा ,
रडू आवरेना आता तर,
इतक्यात,
"काय झालं बाळा?"
खाड्कन जाग,
माझं घर
आईचे रडणारे केविलवाणे डोळे ,
समोर,
मैताला आल्यासारखे बाकीचे सगळे आजूबाजूला,
"आई काय झालं ग?? मला नाही आठवत आहे काहीच. सांग ना."
कोणीच काही बोलायला तयार नाही,
"सांग ना ग आई, बाबा तुम्ही तरी सांगा"
आवाज निघेना घशातून,
कितीवेळ असा पडून होतो कुणास ठावूक,
"तुझा प्रयत्न फसला बाळा." आईचा हुंदका,
अचानक सगळी चक्र उलटी,
त्या नराधमांनी ,
संपवलं होत एक सुंदर स्वप्न,
ती सुंदर परी !
ती सुंदर कल्पना !!