Saturday, June 21, 2014

चारोळी - ६

तीळ तीळ तुटणार काळीज
संपून जाईल असंच

तुलाही परतावं लागेल मग
आली आहेस तसंच

Tuesday, June 10, 2014

चारोळी - ५

तिला आवडतो पाऊस.
म्हणून मला ही भिजायचंय..

तिने धरलेल्या पदराखाली.
डोळं मिटून निजायचंय...!

Sunday, June 1, 2014

चारोळी-4

भेटल्यावर तुला,
रात्र फार व्हायची.
कारणं शोधायचो तेव्हा,
घरी उशिरा जायची..!

Wednesday, May 28, 2014

चारोळी-3

'नया हैं यह' म्हणून
गंडवल तिने मला
पाकीट खाली झाल्यावर म्हणते
'कौन हैं ये साला'

चारोळी-2

सवय जडलीये आता,
रसाळ आंब्याच्या बाठांची.,
पण सर नाही त्याला,
तुझ्या आबोली ओठांची..!

चारोळी-1

अरे हम गरीब हुंए तो हुवा क्या,
करते हैं दिलसे प्यार.
तुला करायचं असेल तर कर वरना,
दुसरी तरी बघू दे ना यार !!

Monday, May 12, 2014

कोणी माणूस आहे का, माणूस??

काळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत.
शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा.
दुसरं अस काहीच त्यांच्या जगण्याचा उद्देश नाही आहे.
हा काही अपवाद आहेत जे खरच एक माणूस म्हणून जगतात, इतरांना जगायला शिकवतात, संघटीत करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात त्यांना यश आहे परंतु ते फारच कमी प्रमाणात.
आजकाल लोकांना आपल्या बाजूला काय चाललंय याच सुद्धा भान राहिलेलं नाही, दुसर्यांच्या लग्नात लागलेला dj ऐकून कानाला हात लावून त्यांच्या नावाने बोट मोडणारे लोक आपल्या पोरांच्या लग्नात मात्र त्या वरच ठेका धरत असतात.
कित्येक वेळा आजूबाजूला हिंस्र पशु सारखी मनुष्यवृत्ती सुद्धा आदळून येते, बायाकापोरींना छेडणे, मारामाऱ्या करणे, दिवसाढवळ्या म्हातार्या माणसांना लुटणे यासारखे प्रकार आजकाल सर्रास दिसू लागले आहेत, मात्र त्यावेळी त्यांना आळा घालणे सोडून त्या वेळेवर टीकाटिपण्णी मात्र वाढू लागली आहे.
मोबाईल ने तर खरच क्रांती केली आहे, माणसं तोडायची, (माणसं जोडली असतीलही पण तोडली जास्त जातात, विचार करून बघा.) ह्याविषयी कितीही बोलाल तर ते कमीच आहे.
आपल आपल म्हणण्याच्या नादात मात्र माणूस एकमेकांपासून दूर जायला लागलाय.
पूर्वी एकत्र साजरे होणारे सण उत्सव आजकाल holidays झालेत.
आजी आजोबांच्या गोष्टी आता outdated झाल्यात.
भावंडासोबतचे खेळ पूर्वीसारखे रंगेनसे झालेत,
आईची माया सुद्धा आजकाल artificial वाटायला लागलेय.
मित्रमंडळी फक्त दारू आणि पार्टी पुरतीच मर्यादित झाली आहे.
माणूस प्रगत होत चालला आहे,
कमवत चालला आहे,
महिन्याला दोन-दोन मोबाईल बदलत चालला आहे,
माणूस माणसांतूनच हरवत चालला आहे.

सुख म्हणजे??



प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतता, त्यामुळे सुखासाठी पळत्याच्या पाठी न लागता जे आहे त्यातच समाधान माना आणि आहे ते चांगल आहे अस मानून पुढे चालत राहा.
आपण खुपदा अनुभवी माणसाणांकडून ऐकत असतो, मूड चांगला असला की आपल्याला ते सगळ पटत सुद्धा (मोठ्यांच बोलन ऐकून घेण ही सुद्धा एक कला असल्यामुळे त्याला असावा मूड लागतो.) आणि कधीकधी आपण खरच असल्या काहीशा गोष्टींवरती विचार करत बसतो कारण त्या काहीतरी खर सांगत असतात.
पण खुपदा ह्या रोजच्या दगदगीमधे पुन्हा आपण हरवतो. मनाला आणि शरीराला बर वाटेल अशा गोष्टीमधे पुन्हा फक्त सुख शोधू लागतो. जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवतेय किंवा ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण आनंदी आहोत त्यांच्या कडेच आपण झुकत रहातो.
परंतु त्याच वेळी ज्या व्यक्ती आपल्याला आपल्याला (वाटणारा) त्रास देतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्या आनंदावर विरजण येत किंवा आपल्याला दुःख होत राग येतो अशा व्यक्तीना मात्र आपण टाळत रहातो. आणि या व्यक्तीं मद्धे बघायला गेल तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी मंडळी असते. म्हणजे बघायला गेल तर आपण आपल्याच माणसांना कंटाळतो, त्यांची काहीच किंमत ठेवत नाही. जिची पूजा करायला पाहिजे त्या आई-बहिणीच्या नावाने एकमेकांना शिव्या घालतो. म्हणजे त्यांच्या वरचा खरतर तिरस्कारच आपण लोकांसमोर मांडत असतो.
पण का?? कारण ते उगाच इरिटेट करतात, नको असतानाही 'लेक्चर' देत बसतात न ऑल.
खरतर हीच लोक आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला बोलत असतात हे मात्र आपण विसरतो, आणि क्षणभंगुर अशा काही 'सुंदर' बोलणाऱ्या लोकांकडे आपण आकर्षित होतो.
माझ ही तसच, आईची आणि माझी सर्रास भांडण होत असतात. मी ही रागाच्या भरात तिला काहीही बोलून कुठेतरी जातो, ती मात्र रोज माझी अरेरावी ऐकून घेत असते, आणि काहीही न बोलता मागच सगळ विसरून रोज सकाळी हसऱ्या चेहऱ्याने माझ्या सुंदर दिवसाची सुरवात करते.
शेवटी आपली ती आपलीच मानस असतात, हे फ़क़्त आई साठी नसून माझा भाऊ, पप्पा, माझे खूप सारे मित्र आणि 'ती' सुद्दा. सगळे मला समजून घेतात आणि प्रत्येक दिवशी आपल्या वाट्याला येणार्या सुखाच्या काही ओंजळी माझ्यावर उधळतात. म त्यांच्यामुळे झाला, तरी थोडासा त्रास आपण का नाही समजून घ्यावा.
सुख म्हणजे पैसा, घर, गाडी, चिकणी गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड हे आहे, की आईच्या हातचा धपाटा, बाबांचे हळूच मारलेले टोमणे, मित्रांनी भांडून वाटून खाल्लेला वडापाव आणि तिने/त्याने अचानक फोन करून म्हटलेल 'i love you.'
पैसा तो हात का मैल है, आणि कमवायला अख्ख आयुष्य पडलय. पण आपल पाकीट अगोदरच इतक्या प्रेमळ माणसांनी भरलय तर अजून कशाची गरज आहे.
आहे ते एंजॉय करायच बस्स, और क्या चाहिये जिंदगी से.

Monday, February 17, 2014

ती सुंदर कल्पना !!

माझ्या डोळ्या देखत ओढलं त्याने,
काळाकुट्ट इसम,
अंगारलेले डोळे,
ताकद एखाद्या हत्तीची त्याच्या अंगी
अंगावर माझ्या शहारे
काहीच कळेना
पण किंचाळण्याचा आवाज मात्र कानावर
"वाचवा कुणीतरी"
काळीज फाडणारी आर्त किंकाळी,
जीव जातानाची सुद्धा नसेल होत अशी तडफड,
हाताच्या मुठी आवळून पुढे होणार मी,
इतक्यात अजून भयानक ३-४ जन मागून,
लोकांची पळापळ, भेदरलेल्या मेंढरांसारखी,
पण किंकाळण्याचा आवाज मात्र हळू हळू तीव्र,
काय करावे अशा वेळेला हे कळत होत,
मानाने ही केला निर्धार,
आयुष्यभर ज्या पुस्तकातून प्रेरणा घेतल्या,
त्यांची एकेक पान डोळ्यासमोर,
पण शरीर साथ देईना,
भोवळ येवुन पडतो कि काय,
काय चाललंय, थांबवायला हव आपण,
सरकलो त्या दिशेने,
नकळत पणे हातात दगड हि घेतला,
आणि पोटाची आतडी फाटेपर्यंत तोंडातून आवाज निघाला,
हिजड्यांच्या औलादी सगळ्या दचकल्या बहुतेक,
माझ्या दिशेने आले काही,
आणि
आणि
बस्स!
डोळ्यासमोर अंधार,
कधी न मिळालेली शांत झोप,
समोर फक्त शांत, निरभ्र आभाळ,
पक्षांचा मंजुळ किलबिलाट,
मंद वारा,
अचानक समोर,
एक सुंदर ललना, तितक्याच सुंदर वेशात,
काय तीच ते रूप, आहा!!
अस्सल नक्षत्र,
सगळ्या परीकथा आठवत,
नकळत गेले दोन्ही हात पुढे,
तिनेही आपले नाजूक हात हातावर ठेवले,
जवळ येवुन कानात काहीतरी कुजबुजली,
आणि,
अचानक,
कुठे गेली,
आता तर होती,
मी शोधू लागलो,
पन कुठेच दिसेना,
मी फक्त एकटा ,
रडू आवरेना आता तर,
इतक्यात,
"काय झालं बाळा?"
खाड्कन जाग,
माझं घर
आईचे रडणारे केविलवाणे डोळे ,
समोर,
मैताला आल्यासारखे बाकीचे सगळे आजूबाजूला,
"आई काय झालं ग?? मला नाही आठवत आहे काहीच. सांग ना."
कोणीच काही बोलायला तयार नाही,
"सांग ना ग आई, बाबा तुम्ही तरी सांगा"
आवाज निघेना घशातून,
कितीवेळ असा पडून होतो कुणास ठावूक,
"तुझा प्रयत्न फसला बाळा." आईचा हुंदका,
अचानक सगळी चक्र उलटी,
त्या नराधमांनी ,
संपवलं होत एक सुंदर स्वप्न,
ती सुंदर परी !
ती सुंदर कल्पना !!

Thursday, January 30, 2014


Yellow

Yellow Marathi Movie


"अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू?? सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग? त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ." 
ऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.



अपेक्षा भंग.

आजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.
काही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.
पण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात. 

पण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.

आपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.

आपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.

जे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला. 

त्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.

सोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.

मुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.

(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )