Friday, January 10, 2014

भडक प्रेम

love triangle, love, triplets

तसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा, आपल्या सुखात स्वतःच सुख मानणारा, असं काहीसं ज्याकडे असेल त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला वेळ, काळ, रंग, जात-पात, उंची, जाडी या काश्शाचीही गरज नसते. फक्त दोन मन जुळायला लागली कि हळूहळू ते एका चांगल्या नात्याचं रुपांतर घेत जात. योग्य त्यावेळी त्याला योग्य तसा आकार दिल्यास आयुष्यभर साथ देणारी भक्कम व्यक्ती आपण आपल्या जवळ बाळगू शकतो. मग इतर कोणाचीही गरज भासत नाही आपल्याला.
प्रश्न असा आहे कि, आजच्या वातावरणात असं कोणी सापडेल का हो आपल्याला??
आजकाल ज्यावयात मुलांना स्वतःची चड्डी सांभाळता येत नाही, त्याच्याकडेच ४-४ girlfriends असतात, आणि तो मुलगापण हे असं सांगत असतो कि जणू कुठे फार मोठी लढाई जिंकून १०-१२ किल्ले जिंकले असावेत.
हे असत कहो प्रेम?
कि प्रेम या नावाचा गैरवापर करून, दोन्ही बगलेत २-२ प्रेमिका कवटाळून, आपली छाती आणि मान वर करून चालणाऱ्या कडून शिकायचं का प्रेम म्हणजे काय ते?
मुलींचंहि तसंच, आजकाल सर्रास २-३ boyfriends फिरवणाऱ्या मुलींचीही कमतरता नाही आहे आपल्या समाजात.

काय चाललंय नेमक ते खरच समजण्या पलीकडच आहे.
पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब वाढलाय हे मान्य आहे कि, पण कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा आणि  कशाचा नाही इतकी अक्कल तरी आजकाल सगळ्यांच्याकडे असेलच. जे चांगल ते घ्या कि, जे वाईट आहे ते नकोच, त्याची गरजच नाही आहे, पण आपण नेमक तेच शिकतोय त्यांच्याकडून, आणि त्या वाईट गोष्टी हळूहळू आपण आपल्या समाजात आपल्याच रूढी-परंपरे सारख्या वापरत आणि पसरवत आहोत.
हे फार धोक्याच आहे, अजून त्याने बाळसं धरलेलं नसलं तरी येणाऱ्या काही वर्षात याचा फार मोठा त्रास आपल्या युवा वर्गाला होणार आहे.

स्पष्ट भाषेत सांगायचं झाल तर मी हे अशाकरता म्हणतोय कि,
स्पर्धा वाढली आहे, रोज आपल्याला फार मोठ्या तानतणाव खालून जाव लागतंय. आणि तो तानतणाव दूर करण्यासाठी आपला तरुण वर्ग सरळसरळ आपल्या partner वरच अवलंबून आहे. त्यामुळे आणि आत्ता तर सरकारी कायद्यामुळे (१८+ कायदा) एकमेकांशी physical होण्याकरता कशाचीहि बाधा येणार नाही.
तुम्ही काय हव ते करा हो. आम्ही कोण सांगणार करा किंवा नको ते.
पण याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम तुम्ही समजून घ्या इतकाच.
मुलांना याचा काही त्रास होत नाही, हे science आहे. पण मुलींचं काय, त्यांना खरच फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत. भले सगळ safe असलं तरी.

हे झाल एक कारण,
पण तुमच्या आयुष्यभराचा जेंव्हा प्रश्न येईल तेव्हा जर तुमचा partner असला तर ठीक, पण नसला तर? त्यावेळेस काय करणार? परत दुसऱ्या कुणावर प्रेम??
म्हणजे परत नव्याशी सगळ तेच rewind करायचं जे आधी झालंय??
पण कितीही प्रयत्न केला तरी तो पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, विसरू शकाल??

माणूस प्राण्याला इतरांपेक्षा वेगळा मानलं जात कारण तो आपल्या एकाच सह्चारीकेसोबत स्वतःच अख्खं आयुष्य व्यतीत करतो. नाहीतर आपल्यात आणि इतर प्राण्यामद्धे फरक तो काय?

प्रेम करा, खूप प्रेम करा, पण फक्त योग्य व्यक्तीवर करा, आणि असं करा कि त्याच्याशिवाय इतर कोणाचाही कधीच विचार येणार नाही आपल्याला.
हिर-रांझा, लैला-मजनू, अशी उदाहरणं आपण प्रेम करताना एकमेकांना देत असतोच ना.
त्यांनी कधीच शारीरिक सुखासाठी नव्हत हो केलं प्रेम.
पण आजकालच पोषक वातावरण ह्या सगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टींना मारक असं आहे.
फक्त तुम्ही त्याचा भाग होऊ नका आणि आपल्या भडक प्रेमाचं उदाहरण ठेवू नका.

Tuesday, January 7, 2014

प्रेमाचा Timepass

Connected 24x7


तुम्ही म्हणाल कि याला दुसरं काही सुचत कि नाही.
पण खर म्हणजे हा विषय आहेच इतका खोल कि त्याच कधीच कोणीही मोजमाप करू शकणार नाही.
पण तरीही आज जरा वेगळ्या दृष्टीने या प्रेमाकडे बघण्याची वेळ आली आहे .
आज जिकडे बघावं तिकडे आपल्याला प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेमाचा (त्यांच्या भाषेत बर का) वर्षाव करत असतात,
दिवसभर mobile वर बोलत असतात, ते झाल कि म Facebook chat, Gtalk आणि आता Whatsapp, इतक उतू जाणार प्रेम आणतात तरी कुठून हा माझ्यापुढचा फार मोठा प्रश्न आहे. (कारण याच मुळे मला फार शिव्या पडतात तिच्याकडून, तिच्या मते मी बोलतच नाही म्हणे, असो )
पण खरच काहो हे दिवसभर इतके close राहिल्यावरच तुमच एकमेकावरच प्रेम वाढत असेल?
ह्या विषयाला नंतर कधीतरी सविस्तर बघूया.
पण अस बोलता बोलता किती वेळ वाया घालवतोय हे आपण कधी पाहिलंय?
आपण गणितच मांडू त्यापेक्षा,
सकाळी उठल्यावर अर्धातास whatsapp वर (अंथरुणात पडल्या पडल्याच)
त्यानंतर collage किंवा office ला जाताना जीतका काही वेळ मध्ये येईल तेवढा वेळ फोन वर,
तरी आपण १ तास धरू.
office मध्ये गेल्यावर आजकाल तर सगळ्यांकडे WiFi असल्यामुळे दिवसभर Facebook सुरूच असते, तरी त्यातला फक्त १ तास आपण धरू,
( collage मध्ये जाणारे बसतात का कधी lectures ला? ते हिशेबात नको )
त्यानंतर घरी जाताना परत १ तास फोन वर.
घरी आल्यावर पुन्हा whatsapp चालू तो रात्री १-२ वाजल्याचे भान नसे पर्यंत.
(आई किंवा वडिलांनी कंबरेत लाथ घालेपर्यंत म्हणा हव तर)
म्हणजे कमीतकमी आणि जवळजवळ ५ ते ६ तास आपण एकमेकांशी connected असतो
(हा सरकारी आकडा नाही बर का, नाहीतर press वाले धरतील मला )

आता फक्त एवढा विचार करा कि ह्या वेळात आपण काय काय करू शकलो असतो.
मला सांगायची गरजच नाही.तुम्हाला माहित आहेच कि या वेळात आपण काय काय करू शकतो ते. (अर्थात तुम्ही सगळे समंजस आहातच. )

सांगायचं एवढच कि प्रेम करा, प्रेम हे व्हायलाच पाहिजे एकदातरी आयुष्यात. प्रेमासारखी दुसरी कोणतीच गोष्ट किंवा भावना ह्या सृष्टीत सापडणारच नाही किंवा आहेच नाही अस म्हटलं तरी त्याची अतिशयोक्ती होणार नाही,
पण त्याच प्रेमासाठी आपला Timepass होणार नाही याची फक्त काळजी घ्या.
जीवन सुंदर आहे, पण ती सुंदरता जरा जपून वापरा, आपल्याच हातून गळा नका घोटू त्या सुंदरतेचा. आपल्या पुढच्या आयुष्यासाठी राखा काहीतरी, किंवा निरस असे बेचव आयुष्य जगायची तयारी करा.

(जरा नवी पद्दत आज वापरली आहे, तरी सांभाळून घ्या)

Monday, January 6, 2014

|| सत्यवचन ||

योग्य तो वकत पाहावा | तेव्हाची उठाव हाणावा ||
सोडूनी मोहाचे पाश | व्यवहार आपला जाणावा ||

मनी नसावी कसची चिंता | समयी आळवावे भगवंता ||
आपण आपुले कर्म करावे | बाकी भाड में जाये जनता ||


Marathi, calligraphy, old, sant, aakashpatil, mimarathiap
|| सत्यवचन ||

Saturday, January 4, 2014

तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक

"काय ह्या ईशाचे नखरे?? आईवर ओरडायला काय झालाय हिला?? त्या बिचारीला काय माहित?? जर एकांत हवा होता तर घरी यायचंच कशाला?? change it !! .. दुसरं काहीतरी लाव..,"
- माझे पप्पा (3 जानेवारीचा  ELTG चा एपिसोड पाहताना)

खरच आपली generation आहेच थोडी short -tempered. जरा काही मनासारख नाही झालं, कि घ्यायचं घर डोक्यावर, आकांडतांडव करायचा, आपल्याच माणसावर ओरडायचं, हे आता घराघरात चालू आहे. कुणाचा राग आपण कुणावर काढतोय याच सुद्धा भान आजकाल आपण विसरत चाललोय. त्यावेळेला ज्याच्यावर रागावलोय त्या व्यक्तीला तर डोळ्यासमोर येवूच देत नाही, मात्र त्या व्यक्तीशी related इतरांवरही आपण आपला राग दर्शवतो.
तसं बघायाला गेल तर थोड बोलून, आपापली बाजू मांडून, विचार विनिमय करून जे पण काही वाद किंवा गैरसमज असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आजकाल जो सगळ्यामध्ये ठासून भरलाय असा स्वाभिमानरुपी EGO(!) आपल्याला हे सगळ करू देतंच नाही. त्याच म्हणन असत कि मीच का म्हणून माघार घेवू, मीच का म्हणून सगळ सहन करू, माझ्याच बद्दल अस सगळ का घडतंय आणि इतर ROFL टाईपचे नाना प्रश्न. पण आपल्या EGO मुळे आपली माणस पण दुखावली जात आहेत हे मात्र त्यावेळेस आपण विसरतो.
काहीजानासोबत discussion केल्यावर मला अस लक्षात आल कि, हे सगळ भीतीमुळे पण होत कधीकधी. एका प्रकारची insecurity निर्माण होते मनात आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागतो , पण त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे आपण लक्षात नाही घेत. ती व्यक्ती पण दुखावलेली असेल, त्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा असतील, त्याला पण स्वतःचे काही problems असतील.
जरा विचार करा, तुम्ही एखाद्याला जेंव्हा I Love You म्हणताय, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्या हृदयात स्थान देताय, मग तुम्ही त्याची एखादी चूक सुद्धा समजून नाही घेवू शकत?? काय नेमक आहे हे तरी कमीतकमी जाणून घ्या कि राव, अस तडकाफडकी नाती तोडून, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण लाथाडून, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पण वागणार नाही अस त्याच्याशी वागण बर वाटत का??
आणि नंतर आपली चूक लक्षात आली कि मग sorry sorry चे msgs करायला परत आपण तयार, म्हणजे व्यक्ती आपल खेळण आहे, जेंव्हा वाटेल तेव्हा छातीशी कावटाळाव नको तेंव्हा फेकून द्याव. हि कसली पद्धत??
प्रत्येकाला स्वतःच स्थान आहे, प्रत्येक जन स्वतःच्या जागी योग्य आणि बरोबर आहे, प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आहेतच, त्याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे, पण म्हणून त्याने कसंही वागण योग्य नाही. कारण आपल्याला लोकांमध्येच राहायचं आहे, म्हणून त्यांच्याशी जुळवून घेण सुद्धा आपल कर्तव्य आहे.
nw grow up!! आपण लहान तर नाही न आता. वाद झालेच तर जरा डोक शांत ठेवा, समोरच्याचं ऐकून घ्या. कोणाच ऐकून घेतलं म्हणजे तुम्ही लहान व्हाल अस काही नाही. पण त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतय ते करा. after all तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक.

( हा फक्त माझा स्वतःचा विचार आहे. आवडल तर घ्या नाही तर next please करा.)

Saturday, December 28, 2013

प्रेमात पडल्यावर

प्रेमात पडल्यावर 


पहिला सगळं ठरवायचं असतं
व्यवस्थित, विचारपूर्वक करायचं असतं
खुपदा भेटून बोलायचं असतं
एकमेकांची मनं जुळवायचं असतं
आवडी-निवडी जपायचं असतं
विशावासाचं नातं विणायचं असतं
कारण एकदा प्रेमात पडल्यावर
पुन्हा मागे वळायचं नसतं
#mimarathiap

Tuesday, December 24, 2013

विश्वास

मोठमोठे लेखक, विचारवंत, कवी किंवा कोणतीही अनुभवी व्यक्ती जेंव्हा प्रेम या गोष्टीबद्दल आपले विचार मांडत असतात, तेंव्हा ते त्यांच्या बोलण्यात प्रकर्षाने एका गोष्टीवर जास्त भर देतात ते म्हणजे 'नात्यांतला विश्वास'.
एखाद स्वच्छ, सुंदर, नितळ नातं जपण्यासाठी पहिल्यांदा त्या दोन व्यक्तीं चा एकमेकांवर पुर्ण विश्वास असणं गरजेच आहे. कारण एखादी चुकीची कृती सुद्धा काहीवेळा आपल्या नात्याला मारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या व्यक्ती आणि तिच्यावरचा विश्वास मिळवण, विश्वास जपणं हे त्यावर प्रेम करण्या इतकचं महत्वाच आहे.
पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. खूप वेळा त्यांच्याशी खोट बोलतो, पाहिलं खोट लपविण्यासाठी अजून एखाद खोट बोलतो, मग त्या खोट्या गोष्टीची link इतकं मोठ स्वरूप धारण करते कि त्यानंतर आपण किती हि आदळ-आपट करून खर सांगायचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात ती सल कायम राहते.
कित्येक वेळा फक्त गैरसमजुतीतून सुद्धा असा तिढा निर्माण होतो, आणि ज्याची काहीच गरज नव्हती असे विषय सुद्धा त्यात आपल्या माथ्यावर येतात,
पळवाट काढणे हा तर विश्वास तोडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग अस मला वाटत, कारण आपण एखाद्या गोष्टीपासून पळ काढत आहोत हे समोरच्या व्यक्तीला कळायला आजच्या generation मध्ये तरी जास्त वेळ लागताच नाही, आणि एकदा का शंकेची पाल चुकचुकली कि मग ती सगळ गिळंकृत केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस आपल्या बद्दल कोणीही काहीही सांगितलेल्या गोष्टी नात्यां मद्धे फुट पाडू शकतात. तेंव्हा योग्य आणि अयोग्य अस काहीच नसत, पण क्षणाक्षणाला द्वेष मात्र वाढत जातो.
ह्या सगळ्या पेक्षा आधीच सगळं clear केलेलं काय वाईट. 
काय असेल ते सरळ सांगा, खर सांगा,
खर सांगायला घाबरायचं कशाला?? 
हा त्यावेळेस व्यक्तीला वाईट वाटेल, चिडचिड होईल,
मात्र ते फक्त त्या वेळेसाठीच असेल, आणि थोडं समजावलं कि झाल,
पण उगाच आपला इगो बाळगून जर त्या नात्यातला गोडवा टिकेल अस वाटत असेल तर ते चुकीच ठरू शकत.
थोडा संवाद, थोड प्रेम, थोडी कुरबुर आणि थोडी मस्ती हे साध सोप गणित असत सुखी राहण्याचं.
जितका एकमेकांवर विश्वास वाढेल तितक ते नात दृढ होत जाईल,

बस्स !!

बाकी काय ,

आपल सगळंच सेम हाय...

Wednesday, December 4, 2013

Thursday, November 7, 2013

'ती' कशी असावी

Rohan Pore, Girlfriend, marathi, poem, kavita, social-ak, mimarathiap
courtesy : Rohan Pore

'ती' कशी असावी


खर म्हणजे वयात आलेल्या सगळ्याच मुलांचं स्वप्न असत, आपल्याला एखादी 'ती' असावी,
मग ती कोणीही असो पण असावीच,
कोणाला वाटत कि मस्त model type असावी, बरोबर ३६-२४-३६ च्याच साच्यातली असावी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी, आणि मोगऱ्याच्या बागेत गुलाबाच फुल असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
काहींच्या मते ती सालस असावी, देखणी नसली तरी चालेल पण मनमिळाऊ असावी,
आपल्याला सांभाळून घेणारी असावी, नाती जोपासणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
आपण भाई (!) असलो तर ती पण तशीच असावी, हातात  सिगरेट आणि तोंडात शिट्टी असावी,
चार शिव्या घालणारी आणि वेळेला हातपाय चालवणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
ती आपली मैत्रीण असावी, माझी bag, mobile, वह्यापुस्तके सांभाळणारी असावी,
माझ्यासाठी घरातून मस्त डबा आणणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
MacD मध्ये treat देणारी असावी, महागडे perfumes, sunglasses देणारी असावी,
रोज movie ला नेणारी असावी, आणि corner seat वर चाळे करणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी,
मला वाटत कि ती फक्त तीच असावी, स्वाभिमान बाळगणारी असावी,
मला आपल म्हणणारी असावी आणि माझ्या स्वप्नात रमणारी असावी,
पण आपल्याला एखादी 'ती' असावी.
#social_ak

Wednesday, November 6, 2013

चड्डीतलं वय

चड्डीतलं वय

ते चड्डीतल वय असतं,
तेंव्हा फक्त ओरडणं, खेळाणं आणि बागडनं असतं,
राग आला कि मारणं असतं,
आणि कुणीतरी मारल्यावर बोंबलत घरी पळणं असतं,
ते वयचं तसलं असतं,
शाळेत न जाण्याची कारणं शोधणारं असतं,
कोणी जबरदस्ती केल्यावर त्यांच्याच हाताला चावणारं असतं,
खडू पेन्सिल खाणारं असतं,
आणि नवीन आणायला पैसे मागणारं असतं,
ते वयचं तसलं असतं,
कोणाच्या तरी हातातलं चांगलं खेळणं बघून रडणार असतं,
ते कस मोडता येईल हे बघणार असतं,
मोडल्यावर त्याला चिडवणार असतं,
पण त्याला जास्त रडताना बघून पुन्हा सांभाळणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
आपल्या गोष्टीवरती अधिकार गाजवणारं असतं,
त्याला हात लावला तर घर डोक्यावर घेणार असतं,
आणि शेवटी त्याची मालकी परत मिळवणार असतं,
ते वयचं तसलं असतं,
पुन्हा कधीच येणारं नसतं..!!
#mimarathiap

Saturday, November 2, 2013