Monday, May 12, 2014

कोणी माणूस आहे का, माणूस??

काळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत.
शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा.
दुसरं अस काहीच त्यांच्या जगण्याचा उद्देश नाही आहे.
हा काही अपवाद आहेत जे खरच एक माणूस म्हणून जगतात, इतरांना जगायला शिकवतात, संघटीत करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात त्यांना यश आहे परंतु ते फारच कमी प्रमाणात.
आजकाल लोकांना आपल्या बाजूला काय चाललंय याच सुद्धा भान राहिलेलं नाही, दुसर्यांच्या लग्नात लागलेला dj ऐकून कानाला हात लावून त्यांच्या नावाने बोट मोडणारे लोक आपल्या पोरांच्या लग्नात मात्र त्या वरच ठेका धरत असतात.
कित्येक वेळा आजूबाजूला हिंस्र पशु सारखी मनुष्यवृत्ती सुद्धा आदळून येते, बायाकापोरींना छेडणे, मारामाऱ्या करणे, दिवसाढवळ्या म्हातार्या माणसांना लुटणे यासारखे प्रकार आजकाल सर्रास दिसू लागले आहेत, मात्र त्यावेळी त्यांना आळा घालणे सोडून त्या वेळेवर टीकाटिपण्णी मात्र वाढू लागली आहे.
मोबाईल ने तर खरच क्रांती केली आहे, माणसं तोडायची, (माणसं जोडली असतीलही पण तोडली जास्त जातात, विचार करून बघा.) ह्याविषयी कितीही बोलाल तर ते कमीच आहे.
आपल आपल म्हणण्याच्या नादात मात्र माणूस एकमेकांपासून दूर जायला लागलाय.
पूर्वी एकत्र साजरे होणारे सण उत्सव आजकाल holidays झालेत.
आजी आजोबांच्या गोष्टी आता outdated झाल्यात.
भावंडासोबतचे खेळ पूर्वीसारखे रंगेनसे झालेत,
आईची माया सुद्धा आजकाल artificial वाटायला लागलेय.
मित्रमंडळी फक्त दारू आणि पार्टी पुरतीच मर्यादित झाली आहे.
माणूस प्रगत होत चालला आहे,
कमवत चालला आहे,
महिन्याला दोन-दोन मोबाईल बदलत चालला आहे,
माणूस माणसांतूनच हरवत चालला आहे.

No comments:

Post a Comment